Ad will apear here
Next
श्रीमद् भगवद्गीता : श्रीकृष्ण बासरीचे सूर
आप्तस्वकीयांविरोधात लढायचे या विचाराने भर रणांगणात अर्जुन गर्भगळीत होतो; पण ही लढाई फक्त कौरव-पांडव यांच्यातील नसून ती संपूर्ण समाज, धर्मासाठी कशी आवश्यक आहे, हे कृष्णाने त्याला छंदोबद्ध काव्यातून सांगितले. ते काव्य म्हणजे गीता, असे वर्णन करून वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी ‘श्रीमद् भगवद्गीता : श्रीकृष्ण बासरीचे सूर’मधून गीतेतील विचार, उपदेश सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोचविला आहे.

गीतेची वैशिष्ट्ये वाचताना रामायण-महाभारत तौलनिक दृष्टीकोन, उपनिषदांचे सार, जीवन मार्गदर्शिका, ब्रह्मविद्येचे ज्ञान, सर्व समावेशकता, गेयता व मंत्रसामर्थ्याचे महत्त्व समजते. गीतापठाणाचा अधिकार, गीतेतील समत्त्वयोग, निष्काम कर्मयोग आणि स्थितप्रज्ञता, समर्पणाचा संदेश यातून कथन केला आहे. महाभारताची कथा तात्कालिक नसून ती सर्वव्यापी कशी आहे, हेही यातून दाखवून दिले आहे.   

प्रकाशक : यज्ञेश्वर प्रकाशन
पाने : २९५
किंमत : २७० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZZIBV
Similar Posts
परब्रह्म असा जो तुकावा तुकाराम गाथेच्या माध्यमातून तुकाराम महाराज यांनी साध्या-सोप्या, पण तितक्याच मार्मिक अभंगाद्वारे जीवन व्यवहाराचे मार्गदर्शनपर भाष्य मांडले आहे. परमपूज्य सद्गुरू श्री वासुदेव वामन गुरुजी यांनी ‘परब्रह्मरूपी असा जो तुकावा’ या पुस्तकातून तुकाराम महाराजांच्या निवडक अभंगांचे साध्या व सरळ भाषेत विश्लेषण केले आहे
ध्यानातून ध्येयाकडे कोणतीही साधना करायची असेल, तर ध्यान आवश्यकच असतो. ध्यानामुळेच मन एकाग्र होते, तल्लीन होते असे सांगत वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी २००९ मध्ये पुष्कर क्षेत्री ‘ध्यान’ या विषयवार दहा विवेचने केली होती. ती ‘ध्यानातून ध्यायाकडे’ या नावाने ग्रंथ रूपात सादर केली आहेत.
पंढरपूरच्या पायी वारीचा इतिहास दर वर्षी निघणारी वारी ही महाराष्ट्राच्या सांकृतिक आणि धार्मिक परंपरेचा मानबिंदू आहे. तसाच तो वारकरी संप्रदायाचाही एक भाग आहे. पंढरपूरला जाणारी आषाढी वारी हा केवळ राज्याचा नव्हे, तर देश-विदेशातील नागरिकांच्या आदराचा आणि उत्सुकतेचा भाग आहे. नीता अंकुश टेंगले यांनी आषाढी वारीचा सर्व बाजूने अभ्यास करून तो वाचकांसमोर मांडला आहे
श्रीपाद वल्लभ श्रीपाद वल्लभांचे हे रसाळ जीवनचरित्र ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी वाचकांसमोर आणले आहे. चौदाव्या शतकात जन्मलेले श्रीपाद वल्लभ आज एकविसाव्या शतकातही प्रिय आहेत, पूजनीय आहेत, ते त्यांच्या अजरामर कार्यामुळे. विजयनगरचे हिंदू साम्राज्य स्थापन करण्याची मूळ प्रेरणा श्रीपादांची होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language