आप्तस्वकीयांविरोधात लढायचे या विचाराने भर रणांगणात अर्जुन गर्भगळीत होतो; पण ही लढाई फक्त कौरव-पांडव यांच्यातील नसून ती संपूर्ण समाज, धर्मासाठी कशी आवश्यक आहे, हे कृष्णाने त्याला छंदोबद्ध काव्यातून सांगितले. ते काव्य म्हणजे गीता, असे वर्णन करून वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी ‘श्रीमद् भगवद्गीता : श्रीकृष्ण बासरीचे सूर’मधून गीतेतील विचार, उपदेश सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोचविला आहे.
गीतेची वैशिष्ट्ये वाचताना रामायण-महाभारत तौलनिक दृष्टीकोन, उपनिषदांचे सार, जीवन मार्गदर्शिका, ब्रह्मविद्येचे ज्ञान, सर्व समावेशकता, गेयता व मंत्रसामर्थ्याचे महत्त्व समजते. गीतापठाणाचा अधिकार, गीतेतील समत्त्वयोग, निष्काम कर्मयोग आणि स्थितप्रज्ञता, समर्पणाचा संदेश यातून कथन केला आहे. महाभारताची कथा तात्कालिक नसून ती सर्वव्यापी कशी आहे, हेही यातून दाखवून दिले आहे.
प्रकाशक : यज्ञेश्वर प्रकाशन
पाने : २९५
किंमत : २७० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)